(मागील भागावरून पुढे) रविवार मोरबी किंवा मोरवी हे काठेवाड मधील साधारण अडीच लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेले एक छोटेसे शहर आहे. काठेवाड मधील बहुतेक शहरांप्रमाणेच 1947 पर्यंत हे शहर म्हणजे सुद्धा एक संस्थानच होते आणि एकोणिसाव्या शतकात तरी आर्थिक स्थिती फारशी चांगली नसलेले ( ब्रिटिशांच्या वर्गवारी प्रमाणे तृतीय दर्जाचे) आणि उत्पन्नाचे फारसे स्त्रोत नसलेले असे संस्थान … Continue reading »
(मागील भागावरून पुढे) शनिवार कच्छ्च्या रणाच्या साधारण मध्यभागी 313 चौरस किमी क्षेत्रफळाचे एक बेट आहे. या बेटाला खादिर बेट या नावाने ओळखले जाते. मी गुरुवारी भेट दिलेला व रणाच्या दक्षिण किनार्यालगत खड्या असलेल्या कालो डुंगर किंवा Black hill या नावाने परिचित असलेल्या पर्वतरांगांच्या साधारण पूर्वेला हे बेट येते. कालो डुंगर नजिकचा किनारा व खादिर बेट … Continue reading »
(मागील भागावरून पुढे) शुक्रवार मी आज सकाळी जरा लवकरच तयार झालो आहे. भोजन कक्षात जाऊन मी चटकन न्याहरी उरकतो व भारताच्या एका दुर्लक्षित कोपर्यामधे स्थापन केलेल्या या विस्मयकारक कॅम्पला अलविदा म्हणतो. अतिशय आरामदायी व्यवस्था आणि कॅम्प व्यवस्थापनाने दाखवलेले उत्तम आतिथ्य यामुळे गेले 3 दिवस इतक्या पटकन संपले आहेत की विश्वास बसणेही कठीण होते आहे. बिनचूक … Continue reading »
(मागील भागावरून पुढे) गुरूवार आम्हाला कॅम्पच्या ऑफिसकडून सूचना मिळाल्या आहेत की रण ओलांडून पैलतीरी जाण्यासाठीच्या बसेस सकाळी 8 वाजल्यापासून मुख्य प्रवेशद्वारापासून निघतील. मी जरा लवकरच उठतो, भोजन गृहात जाऊन न्याहरी घेतो व मुख्य प्रवेशद्वारापाशी बरोबर 8 वाजता पोहोचतो. समोर पहिली निघणारी बस जवळ जवळ भरतच आली आहे. तरी पण काही मंडळी त्यांचे साथीदार न आल्याने … Continue reading »
Reblogged from अक्षरधूळ: रोज सकाळी वर्तमानपत्र वाचताना, “आज पुण्यात” या सदराकडे मी एखादा तरी दृष्टीक्षेप नक्की टाकतो. या सदरामधे, पुण्यामधे त्या दिवशी काय कार्यक्रम आहेत याची माहिती असते. हे कार्यक्रम बहुतांशी विनामूल्य असतात व चांगलेही असतात. कार्यक्रमांना जरी गेले नाही तरी कुठे काय चालले आहे हे समजावून घेण्यातही एक प्रकारची गंमत असते. या सदरात वाचूनच … Continue reading »
Reblogged from अक्षरधूळ: वर्षामधला कोणता ऋतु तुम्हाला सर्वात आवडतो ? असा प्रश्न जर चारचौघांना विचारला तर नक्कीच निरनिराळी उत्तरे मिळतील. धो धो पाउस पडतो आहे . आकाश निळया जांभळया रंगाने झाकोळले आहे. हवेत एक ओला गारठा जाणवतो आहे आणि नजर फिरवावी तिकडे हिरवाई दिसते आहे. असे दृष्य डोळयासमोर आणून कोणी आपल्याला वर्षा ऋतु सर्वात पसंत … Continue reading »
(मागील भागावरून पुढे) 1971-72 या वर्षामध्ये श्री. ए.बी.शर्मा या भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञाने, सुरकोटला येथील टेकाडावर, इ.स.पूर्व 2000 या कालखंडातील घोड्याच्या अस्थी अवशेषांचा लावलेला शोध, पुढची सुमारे 20 वर्षे,जगभरच्या इतर शास्त्रज्ञांनी संपूर्णपणे अमान्यच केल्याने तसा दुर्लक्षितच राहिला. एक सुप्रसिद्ध आणि सन्मानित पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड एच मेडो (Dr. Richard H. Meadow) यांनी उलट या शोधावर टीका … Continue reading »
‘सुरकोटला‘ हे गुजरात राज्यामधील कच्छ जिल्ह्यामध्ये असलेले, एक अगदी छोटेसे खेडेगाव आहे. विकिमॅपियावरील माहितीप्रमाणे या गावाचे अक्षांश-रेखांश, साधारण 23°37′N 70°50′E असे आहेत. त्यामुळे हे खेडे कच्छची राजधानी असलेल्या भूज शहरापासून ईशान्येस साधारण 120 किमी अंतरावर तर रापर गावाच्या ईशान्येस, 22 किमी अंतरावर वसलेले आहे असे म्हणता येते. या खेड्याजवळच 16 ते 26 फूट उंच असलेले … Continue reading »
Reblogged from अक्षरधूळ: कॅलिफोर्निया मधल्या घरातल्या माझ्या खोलीला , चांगली मोठी लांब व रूंद अशी एक खिडकी आहे. एवढी मोठी खिडकी असली तरी बाहेर नजर टाकल्यास फारसे काही दिसत नाही. एकतर शेजारच्या घराच्या कांपाउंडच्या लाकडी फळयाच बाहेरच्या दृष्याचा बराचसा भाग खाऊन टाकतात. व उरला सुरला भाग , एक मोठा वृक्षच आपल्या विस्ताराने अडवून धरतो. या … Continue reading »
पश्चिमेला असलेला भारत आणि पूर्वेला असलेला फिलिपाइन्स यांच्यासह आपल्या अनेक शेजार्यांना एक फटक्यात भडकवण्याचा उद्योग चीनने परत एकदा मोठ्या लीलयेने करून दाखवला आहे. 15 मे 2012 या तारखेपासून, चीनमधील पोलिसांनी इ-पासपोर्ट या नावाने ओळखला जाणारा एक नवा पासपोर्ट चिनी नागरिकांना देण्यास सुरुवात केली आहे. या पासपोर्ट्मध्ये एक मायक्रोचिप घालण्यात आलेली आहे. या चिपवर पासपोर्ट धारकाच्या … Continue reading »
भारतीय द्वीपकल्पामध्ये कधी काळी अस्तित्वात असणार्या व सर्वात पुरातन असलेल्या सिंधू संस्कृतीचा शोध 1920च्या दशकात प्रथम लागला. त्या काळापासून ते आजपर्यंत, सिंधू नदीच्या खोर्यामध्ये आणि पंजाब मधील सिंधू नदीच्या उपनद्यांच्या खोर्यांमध्ये, अगदी समुद्र तटापासून ते हिमालयाच्या पायथ्यापर्यंतच्या प्रदेशापर्यंत, विपुल प्रमाणात उत्खनन व या संस्कृतीबद्दल संशोधन केले गेलेले आहे. या संशोधनाचे फलद्रूप म्हणून आता सर्वसाधारणपणे असे … Continue reading »
नसते वाद विवाद उकरून काढण्यात भारतातील मंडळी जशी वाकबगार आहेत तशी बहुदा दुसर्या कोणत्याही देशातील नसतील. खाप पंचायत ह्या उत्तर भारतातल्या एका जुन्या समाज व्यवस्थेने आता सगोत्र विवाहाचा वाद असाच उपस्थित केला आहे. ही खाप पंचायत तशी अनेक वर्षे अस्तित्वात आहे आणि किरकोळ तंटे मिटवण्यासाठी उपयुक्त असल्याने ब्रिटिश व नंतर स्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने तशीच … Continue reading »
आणखी थोडे काही
बेंगलुरू शहरामध्ये, केंद्र सरकारच्या 'आधार' कार्डासंबंधीच्या संगणक कार्यप्रणाली विकसित करण्यासाठी एक कार्यालय आहे. तुषार आणि मॅट हे या कार्यालयात काम करणारे दोन तरूण. नोकरी लागल्यावर एकच सदनिका शेअर करण्याचे त्यांनी ठरवले व एकत्र रहायला लागल्यानंतर दोघांची चांगलीच मैत्री जुळली. दोघांचे पूर्वायुष्य तसे साधारण एकाच चाकोरीतून गेलेले! तुषार हा हरयाणामधील एका पोलिस अधिकार्याचा मुलगा! भारतातील शिक्षण पूर्ण झाल्यावर अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठातून पदवीधर झाल्यावर इनव्हेस्टमेंट बॅन्कर म्हणून 3 वर्षे अमेरिका व सिंगापूरला काम केलेला! मॅट हा आपल्या आईवडिलांबरोबर लहान वयातच अमेरिकेला स्थायिक झाला. अमेरिकेतील एम आय टी सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून त्याने शिक्षण घेतले. या दोन्ही तरूणांच्या मनाने घेतले की आपण भारतात परत जावे म्हणजे आपल्या देशाला आपला काहीतरी उपयोग होईल. त्याप्रमाणे ते परत आले व त्यांनी बेंगलुरूमध्ये ही नोकरी घेतली. (more…)
सीबीआय ही सर्व प्रकारच्या गैरव्यवहारांची चौकशी करणारी भारतातली सर्वात श्रेष्ठ दर्जाची यंत्रणा मानली जाते. या सीबीआयचे महासंचालक श्री. ए.पी.सिंग हे गृहस्थ आहेत. आंतर्राष्ट्रीय पोलिस संघटना किंवा इंटरपोलने नुकताच " भ्रष्टाचार टाळण्यासाठी व अवैध रित्या जमा केलेला पैसा उघड करण्यासाठी इंटरपोलचा जागतिक कार्यक्रम " ( Interpol global programme on anti-corruption and asset recovery ) हातात घेतला आहे. या निमित्ताने आयोजित केलेल्या कॉन्फरन्सच्या उदघाटन प्रसंगी या सदगृहस्थांनी तुम्हाला आम्हाला माहिती असलेली एक गोष्ट परत सांगितली. मात्र त्यांनी या बाबत जी काही डिटेल्स दिली ती मोठी रोचक आहेत. (more…)
मला आठवते की मागच्या वर्षी कधीतरी एक बातमी मी वृत्तपत्रांतून वाचली होती. कर्नाटकच्या सर्व आमदारांना स्मार्टफोन देण्यात येणार म्हणून!. त्या वेळेस मला थोडे आश्चर्यही वाटले होते की ही मंडळी हे स्मार्टफोन घेऊन काय करणार? पण राज्यासमोर असलेल्या निरनिराळ्या प्रश्नांची माहिती करून घेता यावी. त्यांच्या मतदारसंघांतील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, शेती उत्पादन या सारख्या संख्या लक्षात ठेवता याव्या व मूलभूत स्वरूपाची माहिती स्वत:जवळ ठेवण्यासाठी हे स्मार्टफोन दिले गेले असल्याची माहिती या बातमीत दिलेली होती.
पण 2 दिवसापूर्वी कर्नाटक विधानसभेत, सत्र चालू असताना, लक्ष्मण सावेदी, सी.सी.पाटील व जे. कृष्णा पालेमार हे तीन मंत्री आपल्या स्मार्टफोनवर अश्लील चित्रफीत बघत असताना त्यांचे चित्रीकरण टीव्ही वाहिन्यांनी करून आपल्या वाहिन्यांवरून प्रसृत केले व कोणत्या कारणासाठी या मंडळींना हे स्मार्टफोन खरे तर हवे होते याचा उलगडा झाला. (more…)
काही वर्षांपूर्वी हैदराबादला गेलो होतो त्या वेळी, तिथले जगप्रसिध्द सालारजंग संग्रहालय नव्या वास्तूत गेले आहे असे समजल्याने, लक्षात ठेवून ते मुद्दाम परत बघायला गेलो होतो. तिथली दालने बघत असताना एका दालनात खुद्द निझाम व त्याचे सरदार यांचे रत्नखचित अंगरखे चौकटींच्यात मांडून ठेवलेले दिसले.ह्या अंगरख्यांवर सोन्या-चांदीच्या तारेने कशीदा तर काढलेला होताच पण त्या शिवाय निरनिराळी रत्नेही जडवलेली होती. दिव्यांच्या प्रकाशात हा कशीदा व रत्ने मोठी चमचम करताना दिसत होती. त्याच वेळी मनात विचार आला होता की असे चौकटीत मांडून ठेवलेले हे अंगरखे बघायला जरी मोठे मोहक दिसत असले तरी ते अंगाखांद्यावर वापरणे मोठे कर्म कठिण काम आहे. अंगाला तो कशीदा सारखा घासणार, ती रत्ने उठता बसताना टोचणार, वेळप्रसंगी अंगातून रक्तही काढणार. तेंव्हा त्यांच्यापासून मी लांब आहे तोच बरा. परवा सहज विचार करत असताना असे लक्षात आले की अरे! आपली नाती गोती पण या अंगरख्यांसारखीच आहेत की! जोपर्यंत ती लांब चौकटीत मांडलेली होती तोपर्यंत अशीच मनाला सुखद वाटत होती. अंगाखांद्यावर वावरण्याची वेळ आल्यावर ती पण अशीच घासू आणि टोचू लागली आहेत. एखादे वेळी ओरखडा व रक्ताचा थेंब सुध्दा दिसतो आहे. ग़ोत्यांत नेतात ती नाती हे मनाला पटू लागले आहे. (more…)
काही जुने! खास माझ्या आवडीतले लेख!
वर्दे गुरुजी
माझ्या मोठ्या आत्याबाई, एका प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करत असत. शिक्षकांना रहाण्यासाठी, संस्थेने आवाराच्या एका कोपर्यातच, एक चाळवजा दगडी इमारत बांधलेली होती. त्याला शिक्षक चाळ असे म्हणत. प्रत्येक बिर्हाड, आगगाडीच्या डब्यांसारख्या जोडलेल्या, तीन खोल्यांचे असे. माझ्या आत्याचे बिर्हाड अगदी कोपर्यातले होते. मे महिन्याच्या सुट्टीत मी पुष्कळ वेळा आत्याकडे रहायला जात असे. ही संस्था तशी गावापासून बरीच लांब असल्याने दिवस रात्र तसा शुकशुकाटच असे. रात्री रातकिड्यांच्या किरकिरण्याशिवाय दुसरे फारसे आवाज कधी ऐकू यायचे नाहीत. मी असाच एकदा आत्याकडे रहायला गेलो असताना, रात्री अतिशय सुमधुर अशा गाण्याचे स्वर ऐकू येऊ लागले. गंमतीची गोष्ट म्हणजे तेच गाणे चार पाच वेळा परत परत ऐकायला मिळाले. आत्याला विचारल्यावर ती म्हणाली “गुरुजी गाणे बसवत असतील शाळेच्या कार्यक्रमाचे, म्हणून फोनो घरी आणला असेल.” मग नंतर काही गाणे ऐकू आले नाही आणि मी झोपून गेलो.
Read more
जिगसॉ पझल
मी लहान असताना, सुप्रसिद्ध लेखिका इरावतीबाई कर्वे या आमच्या घरासमोरच असलेल्या त्यांच्या बंगल्यात रहात असत. एकतर त्या वेळी एरंडवण्याच्या माळावर असलेल्या आमच्या वस्तीत, फारशी घरे अशी नव्हतीच आणि दुसरे म्हणजे, कर्वे कुटुंब तसे आमच्या नात्यातलेच होते. त्यामुळे कर्व्यांच्या घरात माझे जाणे येणे बरेच असे. एकदा इरावतीबाई काही कामासाठी अमेरिकेला गेल्या. परत येताना त्या 5000 तुकड्यांचे एक भले थोरले जिगसॉ पझल किंवा कोडे घेऊन आल्या. सामान आणण्यावरचे वजनाचे निर्बंध त्या वेळी खूपच कडक असत. त्यामुळे ते पझल सुटे करून एका पिशवीतून ते तुकडे त्यांनी आणले होते. घरी आल्यावर एक मोठ्या लाकडी टेबलावर त्यांनी आमचा मुलांचा कॅरम बोर्ड ठेवून त्यात या सगळ्या तुकड्यांचा ढिगारा केला होता. त्या तुकड्यांतून कोणते चित्र निर्माण होणार आहे? कोणता तुकडा कडेचा आहे? आणि कोणता तुकडा कोणत्या तुकड्याला जोडला जाईल? हे सर्व सांगणे केवळ अशक्य होते. घरातले, लहान मोठे, आले गेले सर्व जण या तुकड्यांवर अगदी दहा पंधरा मिनिटांचा वेळ असला तरी आपला हात चालवून बघत. प्रथम प्रथम काहीही कल्पना न येणारे ते चित्र जसजसे दिवस गेले तसतसे स्पष्ट होऊ लागले. काळपट असणारे तुकडे जमिनीचा भाग असतील असे आधी वाटले होते पण नंतर ते एका झाडाचा भाग निघाले. नक्की आकाशाचे म्हणून काही निळसर तुकडे आम्ही बाजूला काढले होते ते तर समुद्राचे निघाले. जे तुकडे एकमेकाला जोडले जातील असे वाटले होते ते प्रत्यक्षांत विरुद्ध कोपर्यांतले निघाले. महिना दोन महिन्यांनंतर जेंव्हा ते चित्र पूर्ण झाले तेंव्हा आमच्या कल्पनेतल्या चित्रापेक्षा संपूर्ण निराळेच असे चित्र आमच्या नजरेसमोर आले होते. Read more
शनिवारवाडा
शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज हे सन 1707 मध्ये मोगलांच्या कैदेतून सुटून महाराष्ट्रात आले व इ.स. 1713 मध्ये त्यांनी बाळाजी भट यांची, पंतप्रधान पेशवा म्हणून नियुक्ती केली. इ.स. 1817 मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज, सातार्याचे प्रतापसिंह महाराज हे इंग्रजांच्या स्वाधीन झाले व त्यांच्याच सांगण्यावरून प्रतापसिंह महाराजांनी त्या वेळचे नियुक्त पेशवे, बाजीराव रघुनाथराव यांना पेशवेपदावरून दूर केले. या दोन घटनांमधील 104 वर्षांच्या कालखंडात, मराठी राज्याची सर्व सत्ता, बाळाजी भट व त्यांच्या घराण्यातील 5 पिढ्यांच्यातील पुरुष, यांच्याच हातात पेशवे म्हणून एकवटली होती. आपल्या कर्तुत्वाने पेशव्यांनी, अटकेपर्यंत आपले झेंडे लावले आणि सर्व उत्तर हिंदुस्थान आपल्या अंमलाखाली आणला होता. या कालात सर्व सत्ता सूत्रे पुण्यातून हलत असल्याने पुणे हे हिंदुस्थानचे सत्ता केंद्र झाले होते. मराठ्यांच्या या सत्तेला, वैभवाला साजेशी त्यांची गादी असली पाहिजे या हेतूने थोरले बाजीराव पेशवे यांनी, पुण्यामध्ये मुठा नदीच्या काठावर एक भव्य आणि सुरक्षित वास्तू बांधायचे ठरवले व 10 जानेवारी 1730 रोजी त्यांनी या वास्तूचा भूमिपूजन समारंभ केला. अशी दंतकथा आहे की या ठिकाणी बाजीराव पेशव्यांनी एका सशाला कुत्र्याचा पाठलाग करताना पाहिले. हे पाहिल्यावर बाजीरावांच्या असे मनात आले की या जागेत काहीतरी विशेष असले पाहिजे व त्यांनी ही जागा पेशव्यांच्या गादीसाठी मुक्रर केली. ही जागा त्यावेळी पुणे कसब्यात मोडत होती व या जागेभोवती मातीची भिंत बांधलेली होती. त्यावेळी या जागेत फक्त काही कोळी व कोष्टी वास्तव्य करून असत. बाजीराव पेशव्यांनी या लोकांना, मंगळवार पेठेत पर्यायी जागा उपलब्ध करून दिल्या व 5 एकर क्षेत्रफळाची ही जागा आपल्या ताब्यात घेतली. Read more
वाचकांचा प्रतिसाद